Homeकोकण-महाराष्ट्रघोडबंदरसह उर्वरित ठाण्याला बारवीतून ५० एमएलडी पाणी आमदार संजय केळकर यांचा राज्य...

घोडबंदरसह उर्वरित ठाण्याला बारवीतून ५० एमएलडी पाणी आमदार संजय केळकर यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा

ठाणे: बारवी धरणाची उंची वाढवल्याने बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात ठाणे महापालिकेचे योगदान आहे, त्यामुळे बारवीतून ५० दशलक्ष लिटर पाणी कोपरी-वागळे वगळता घोडबंदरसह उर्वरित ठाण्याला मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार संजय केळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-वागळे भागाला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून २० दशलक्ष लिटर पाणी देण्याची घोषणा केली. यामुळे कोपरी-वागळे भागातील नागरीकांना दिलासा मिळाला असतानाच उर्वरित ठाण्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत. घोडबंदरसह दिवा आणि अन्य भागातही पाणीटंचाई भेडसावत असताना या भागांना तत्काळ दिलासा का देण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागांना ज्यादा पाणी देण्याबाबत आग्रही असून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली.
या आधीच्या महाविकास आघाडी सरकारने ठाण्याला ज्यादा एक एमएलडी पाणीही दिले नाही. मात्र शिंदे-फडणवीस सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले. अधिक पाणी साठ्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवताना बाधित झालेल्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात अन्य महापालिकांप्रमाणे ठाणे महापालिकेचेही योगदान आहे, त्यामुळे बारवीतील पाणी ठाण्याच्या हक्काचे आहे. येथून ५० एमएलडी पाणी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील असून राज्यसरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचे केळकर यांनी सांगितले. केले.

“घोडबंदर परिसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून पाणी अपुरे पडत आहे. गृह कर्जाचे हफ्ते भरताना या नागरिकांवर नाहक पाण्याच्या टँकरचा लाखोंचा बोजा नाहक पडत आहे, ही बाब संतापजनक आहे. दिव्यातही पाण्याची टंचाई वर्षभर जाणवते. या भागासह ठाण्यातील अन्य भागात भेडसावणाऱ्या पाणीटंचाई विरोधात आम्ही मोर्चे काढले, आंदोलनेही केली आहेत.”

– संजय केळकर
error: Content is protected !!