दिवा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करून देशातील मागासलेल्या घटकास सर्वोच्च पदावर विराजमान केले. हा चमत्कार फक्त भारतीय जनता पक्षात पंतप्रधानांच्या विचारांनी घडू शकतो असे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवून मागासवर्गीय घटकांचा सन्मान केला आहे. ते नवनिर्वाचित राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या जल्लोष कार्यक्रमात बोलत होते. मागासवर्गीय घटकांना प्रवाहात आणून त्यांच्यावर सर्वोच्च पदाची सूत्रे देण्याची किमया फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज देशाची प्रगती झाल्याची देखील मुंडे यांनी सांगितले.
आदिवासी महिलेला मिळालेल्या बहुमानाचा सन्मान करण्यासाठी दिवा शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवा शील मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान देशाच्या इतिहासात सोनेरी पानांनी लिहिले जाईल. याप्रसंगी दिवा शील मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्यासह ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत भाजपयुमो अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील,
ठाणे शहर कार्यकारी सदस्य गणेश भगत, सीमा भगत मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर अंकुश मढवी, वीरेंद्र गुप्ता जिलाजित तिवारी नागेश पवार, राहुल साहू, आशिष पाटील, सुमित मढवी, शैलेश भोईर, सुदेश पाटील, मधुकर पाटील, गौरीशंकर पटवा, आनंदा पाटील, अवधराज राजभर, विजय वाघ, अशोक गुप्ता कार्यकर्ते उपस्थित होते.