Homeठाणे-मेट्रोमुंब्र्यात निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल , निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी

मुंब्र्यात निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल , निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी

ठाणे :- मतचोरीसाठीच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी भाजपसाठी काम केले, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांनी निवडणूक आयोगाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे सप्रमाण दाखवून दिले. तसेच, नवी दिल्ली येथे सोमवारी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले होते. त्याच अनुषंगाने आज मुंब्रा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार आंदोलन केले.

डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार, सय्यद अली अशरफ, अशरफ शानू पठान, शमीम अहमद खान यांच्या सहकार्यातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चार वाजता मुंब्रा शहराच्या विविध भागातील शेकडो नागरिक हातात संविधानाच्या प्रती तसेच निवडणूक आयोगाच्या निषेधाचे फलक घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले. आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर है; वोट चोर … गद्दी छोड; पहले लढे थे गोरो से… अब लडेंगे वोटोचोरोसे, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद, वोट बचाने निकले है… आवो हमारे साथ चलो, वोट चोरो सावधान.. जाग उठा है हिंदूस्थान , अशा घोषणा दिल्या.

या प्रसंगी मर्जिया शानू पठाण म्हणाल्या की, संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिली आहे. मात्र, आता निवडणूक आयोग हे हुकूमशहाच्या अधिपत्याखाली काम करीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतांची चोरी करून सत्ताधारी निवडले आहेत. एकाच घरात 80 लोक, एका इमारतीत 7 हजार मतदार, 80 वर्षांची नवमतदार, एकाच माणसाचे पाच राज्यातील मतदार याद्यांमध्ये समावेश हे सर्व पुराव्यानिशी राहुल गांधी यांनी उघडकीस आणले आहे. एका मतदारसंघात लाखभर मतांची चोरी होत असेल तर सबंध देशभरात एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार या निवडणूक आयोगाने दाखवून भाजपला निवडणूक जिंकून दिली आहे. याचाच अर्थ ही लोकसभेची निवडणूक बेकायदेशीर आहे.

या आंदोलनात फरज़ाना शाकिर शेख, शाकिर शेख, साकिब दाते, नाज़िम खान बुबेर, महशर शेख, इमरान शेख, समीर मालिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

error: Content is protected !!