ठाणे : पाचपाखडी, धर्मवीर नाका,नितीन कंपनी सर्विस रोडवर मंगळवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास उलटलेल्या रिक्षाला आग लागली. ही आग अवघ्या दहा मिनिटात नियंत्रणात आणण्यात यश आले. आग लागली तेंव्हा रिक्षामध्ये सुदैवाने प्रवासी नसल्याने मोठे अनर्थ टळले. तर रिक्षाचालक हा आग लागल्यानंतर रिक्षा सोडून तेथून पळून गेला.या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली होती. यावेळी ०१-रेस्क्यू वाहनासह ०१-फायर वाहन पाचारण करण्यात आले होते.
मात्र, रिक्षा कशी उलटली आणि तिला कशी आग लागली याबाबत समजू शकले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.