दिवा:-धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी सदाशिव दळवी नगर, एंजल पॅराडाईज शाळा, नारायण भगत नगर कडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.त्या रस्त्यावर संडासचे पाणी वाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार केल्या नंतर एंजल पॅराडाईज शाळे समोर गटार बांधण्यासाठी सुरू केले.परंतु ५ महिने झाले तरी ते गटार अर्धवट पडून आहे.रस्त्यावरून संडासच्या पाण्यातून नागरिक ,विद्यार्थी,वृद्ध जातात.याकडे पालिका प्रशासन लक्ष देणार आहे की नाही.आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा? असा सवाल अमोल केंद्रे यांनी विचारला आहे.नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये.सदर प्रकरणी तत्काळ कार्यवाही न केल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अमोल केंद्रे यांनी दिला आहे.सदर आंदोलनाची जबाबदारी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त,सार्वजनिक बांधकाम विभाग,सर्वांची असेल असे निवेदन दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी दिले आहे.