ज्योती पाटील व रोहिदास मुंडे यांचा नागरिकांच्या हितासाठी कौतुकास्पद उपक्रम
दिवा:-दिव्यात असणाऱ्या पाणी टंचाई विरोधात एकीकडे मोर्चा आंदोलने काढून नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ज्योती पाटील यांनी दुसरीकडे बी आर नगर भागातील पाणी टंचाई असणाऱ्या भागाला मोफत टँकरने पाणी पुरवठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला सुरू केला आहे.
दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ज्योती पाटील यांनी दिव्यातील पाणी टंचाई असणाऱ्या भागातील नागरिकांना मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. ज्योती पाटील या एकीकडे दिवा भाजपच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे नागरिकांची पाणी समस्या मांडत आहेत तर दुसरीकडे स्वतः नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करत आहेत यामुळे नागरिक त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आहेत.