दिवा:- ऐतिहासिक शहर असणाऱ्या महाड जवळ रेल्वे स्थानक उभारण्यात यावे अशी मागणी दिवा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजकांत पाटील यांनी केली आहे.
वीर स्थानक ते पोलादपूर दरम्यान कोणतेही रेल्वे स्टेशन नसल्याने या भागातील प्रवाशांची गैरसोय होते.छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगड व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चवदार तळे भागाला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुद्धा महाड स्टेशन झाल्यास सोयीचे होईल.महाड शहराचे महत्त्व वाढेल त्याच बरोबर याभागातील हजारो नागरिकांना रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल असेही राजकांत पाटील यांनी म्हटले आहे.तरी रेल्वे प्रशासनाने याबाबतीत योग्य ती कार्यवाही करून महाड रेल्वे स्टेशन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा अशी मागणी राजकांत पाटील यांनी केली आहे.