Homeठाणे-मेट्रोकिमान दिवाळी सणात तरी दिव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करा-ज्योती पाटील

किमान दिवाळी सणात तरी दिव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करा-ज्योती पाटील

दिवा:-दिवाळी सणात पाणी टंचाई असल्याने दिवा शहरातील महिलांना त्रास सहन करावा लागतो. दिवा शहरातील महिलांना दिलासा देण्यासाठी दिवाळी सणात महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा वाढवून उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी तन्वी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ ज्योती राजकांत पाटील यांनी केली आहे.

ऐन दिवाळी सणाच्या सुरवातीलाच दिवा शहरातील अनेक भागात पाणी टंचाई आहे.काही भागात दोन दोन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.दरवर्षीच्या पाणी टंचाईचे महिला वर्ग हैराण आहे.आधीच दिवाळी सणात नागरिकांचे आर्थिक बजेट वाढत असताना त्यात पाण्यावर खर्च वाढल्यास नागरिकांना आर्थिक फटका बसतो असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.

दिव्यात नेहमी असणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन किमान सणासुदीच्या दिवसात तरी महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा वाढवून उच्च दाबाने दिवा शहरात पाणीपुरवठा करावा अशी मागणी ज्योती पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

ज्या भागात पाण्याच्या लाईन नादुरुस्त आहेत तिथे टँकरने पाणी द्या..

दिव्यातील ज्या भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त आहेत किंवा अद्याप अंतर्गत पाईपलाईन पडलेले नाहीत, अशा इमारतींना व चाळींना महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा या दिवाळी सणात करावा अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली आहे.दिव्यातील नागरिकांना प्रत्येक सणासुदीला पाण्यामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने स्वतःहून या उपायोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.


”दिव्यात नेहमीची पाणीटंचाई आहे.पण किमान सणासुदीच्या दिवसात उच्च दाबाने पाणीपुरवठा झाल्यास काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळेल.महापालिका प्रशासनाने याबाबत नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.”

  • ज्योती राजकांत पाटील
    अध्यक्षा,तन्वी फाउंडेशन
error: Content is protected !!