Homeठाणे-मेट्रोठाण्यात चार गाड्यांना आग ; रिक्षा आणि दुचाकी जळून खाक

ठाण्यात चार गाड्यांना आग ; रिक्षा आणि दुचाकी जळून खाक

ठाणे: मानपाडा, हॅप्पी व्हॅली जवळ पार्क केलेल्या चार वाहनांना आग लागली असून यामध्ये रिक्षा आणि दुचाकी जळून खाक झाले आहे. तर अन्य दुसरी दुचाकी निम्मी तर तिसरी दुचाकी किरकोळ जाळली आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास समोर आल्यानंतर अवघ्या पंधरा ते २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
मानपाडा येथे वाहनांना आग लागल्याची मिळताच घटनास्थळी चितळसर पोलीस, ठामपा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी तातडीने धाव घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नसून रजितराम यादव यांची रिक्षा आणि माला पवार यांची दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याशिवाय रविंद्र खरात यांच्या दुचाकीचा निम्मा भाग जळल्याने नुकसान झाले आहे. तसेच दुर्गेश यादव यांच्या दुचाकीचे अत्यंत किरकोळ नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!