Homeठाणे-मेट्रोढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर.... राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरची चर्चा

ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर…. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरची चर्चा

ठाणे :- “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही”, असा संदेश देणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने चंदनवाडी परिसरात लावले आहेत. या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा परिसरात सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष सोडला आहे. त्यांचे नाव न घेता, असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापले यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले आहे.
चापले यांनी, चंदनवाडी , गणेशवाडी परिसरात हे बॅनर लावले असून बॅनरवर, ” पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचे काम शाळा मास्तर करतो. आमचा मात्र लय खमक्या आहे” आणि “डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेब हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात! एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडल्याने नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही !!”, असे संदेश लिहून पक्ष सोडणार्यांची ढ विद्यार्थी अशी निर्भत्सना राजू चापले यांनी केली आहे.

error: Content is protected !!