दिवा :- शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिवा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाने एक ऍक्शन प्लॅन तयार करावा अशी मागणी भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्ष दिव्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगताना येथील नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दिवा भाजप करत असल्याचे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे. दिवा शहरातील समस्यांचा एकत्रित अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ऍक्शन प्लॅन तयार करावा व त्यानुसार येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे. दिव्यात असणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना गराजेच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष दिव्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबध्द आहे.
– ज्योती पाटील