
दिवा:- दिवा शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत पालकांनी जेवण पुरवठा करणाऱ्या ठिकाणी धडक दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील देखील उपस्थित होत्या.ज्योती पाटील व पालकांनी यावेळी संबंधित जेवण पुरवठादाराला जाब विचारत निकृष्ट दर्जाचे जेवण लहान मुलांना पुरवून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी पालकांसह ज्योती पाटील यांनी केली.दिव्यातील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवले जावे अशी मागणी यावेळी ज्योती पाटील यांनी केली. जर आमच्या मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाणार असेल तर शासनाचे जेवण आमच्या मुलांना नको अशी भूमिका यावेळी पालकांनी मांडली.श्रावणी कदम,जानवी परब,सुवर्णा बांदेकर,उदय कांबळे यांसह इतर पालक यावेळी उपस्थित होते.
जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दिव्यातील एका गाळ्यात हे जेवण बनवले जाते.त्यासाठी अशुद्ध पाणी वापरले जाते. बेसनचे पीठ व कॉर्नफ्लॉवर वरण घट्ट होण्यासाठी वापरले जाते. तांदूळही अर्धवट शिजलेले असतात. मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.अनेक पालकांच्या तक्रारी याबाबत आहेत, प्रशासनाने यावर वेळीच कारवाई करावी!
- ज्योती पाटील,
- दिवा शहर संघटीका,शिवसेना UBT
