Homeशहर परिसरदिव्याला स्वतंत्र पोलीस ठाणे द्या,शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांची...

दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाणे द्या,शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांची सह्यांची मोहीम!

दिवा:-दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केले जावे या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने दिवा शहरात सह्यांची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 10 ऑगस्ट रोजी दिवा शहरात ही सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.दिवा शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व येथील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या तक्रारी दिवा शहरातच नोंदवता याव्यात यासाठी दिवा शहरात पोलीस स्टेशन सुरू होणे गरजेचे आहे असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे . सध्या दिव्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी मुंब्रा येथे पायपीट करावी लागते. दिवा पोलीस चौकी मध्ये अपुरे मनुष्य बळ असल्याने पोलीस प्रशासनावर ताण येतो. दिवा शहराची लोकसंख्या साधारण पाच लाखाच्या आसपास आहे. नागरिकांच्या तक्रारी व सुरक्षितेच्या दृष्टीने उपलब्ध असणाऱ्या पोलीस बळावर येणारा ताण लक्षात घेऊन दिवा शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केले जावे असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.मागील वर्षी मुख्यमंत्री यांनी दिवा शहरात घेतलेल्या सभेत दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर केल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे. दिवा शहरातील नागरिकांच्या भविष्यासाठी व येथील महिला सुरक्षा, नागरी सुरक्षा व कायदा सुव्यवस्था प्रश्न लक्षात घेऊन दिवा शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण व्हावे यासाठी नागरिकांची सह्यांची मोहीम घेऊन, नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ठाणे पोलीस आयुक्तांना दिले जाणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी दिली आहे.

error: Content is protected !!