ठाणे :- ‘वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोन दलाल महिलांना ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात या पथकाला यश आहे. ही कारवाई गुरुवारी (ता.०५) रोजी उल्हासनगर येथे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर ४,कृष्ण नगर येथे दोन महिला दलाल काही पिडीत व असहाय्य महिलांना फुस लावुन वेश्यागमनासाठी बोलवणार आहे.अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन दलाल महिलांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात असलेल्या ०३ पिडीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी
त्या दोन महिला दलालांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४३(१), १४३(३), ३(५) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.