ठाणे:- खेळात हार जीत महत्वाचे नाही खेळात सहभाग घेणे महत्वाचे आहे, तुम्ही सर्व जिगरबाज आहात, तुम्ही सर्वच जिंकलेलं आहात, महाराष्ट्राचे पोलीस खिलाडी नंबर एक आहे. हे जगाला दाखवून द्या असे प्रतिपदान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आमच्या लाडक्या बहीण आहेत. तसेच सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे त्याचा ताण तुमच्यावर आहे, परंतु त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांची कास आपण धरायला हवी असेही सांगताना, तुफानो मे ताश का घर नहीं बनता, रोने से मुकंदर नहीं बनता, हारने से कोई फकीर और जितने से कोई सिकंदर नहीं बनता अशी शेरोशायरी ही त्यांनी यावेळी केली.
ठाण्यात आयोजित केलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेचा गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्याप्रसंगी बोलताना, वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर शिंदे यांच्या समवेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आदींसह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
एरवी गुन्ह्यातील तपासासाठी न्यायालयासाठी ठाण्यात आले असाल आता स्पर्धे साठी आला आहात असे स्वागत केले. आपण म्हणतो पुणे तिथे काय उणे, आता ठाणे तिथे काय उणे असे म्हणावे लागेल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना हे स्पर्धेचे जग आहे येथे टिकून राहण्यासाठी पळावेत लागते. इथे पंच आहेत पंचनामा नाही, इथे नोंद आहे पण विक्रमांची असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सणासुदीला पोलीस रक्षण करतात, उन-वारा न बघता रक्षण करतात, कोविड मध्ये तुम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्राण वाचवले असे कौतुकही त्यांनी यावेळी पोलिसांचे केले.
प्रतिस्पर्धक पोलिस दल म्हणून महाराष्ट्र पोलिस दलाकडे पहिल जाते. त्यामुळे तुम्ही पदकावर लक्ष केंद्रित करा व्यवस्थेत ठाण्यात कमी पडणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. ठाण्यातील साकेत मैदानात सिंथेटीक ट्रॅक आणि हायमास लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी हे काम करुन घ्यावे अशा सुचना त्यांनी केल्या. यासाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल पैशाची कमी पडणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.