Homeठाणे-मेट्रोमहाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका - नरेश म्हस्के

महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका – नरेश म्हस्के

ठाणे: मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तर, वेगळा काही मार्ग असेल तर तो सांगावा केवळ सल्ले देण्याचे काम करू नये. शिवाय ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावी की देऊ नये हे जाहीर करावे. उगाच गोल गोल फिरून बोलू नका, येत्या दोन-तीन दिवसात राज्यपाल त्या काढलेल्या आदेशावर स्वाक्षरी करतील आणि मराठ्यांचे दहा टक्के आरक्षण जाहीर होईल असेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले. दरम्यान 22 राज्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, त्यामुळे हे आरक्षण टिकणार असल्याचा दावाही म्हस्के यांनी यावेळी केला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक येऊन ते कसे फसवे आहे किंवा चुकीचे आहे अथवा सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही. किती जणांना नोकरी देणार अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत गुरुवारी म्हस्के यांनी पत्रकार परिषद बोलून महाविकास आघाडीवर टीका केला. जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नव्हता, तर सभागृहात तुम्ही विरोध का नाही केला असा सवाल ही उपस्थित केला. तसेच सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर दुसरी भूमिका घ्यायची हे दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे आहे. दोन दगडावर पाय ठेवणारी ही मंडळी आहे असे ते म्हटले. जर घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर शरद पवार यांनी मार्गदर्शन करावे तुम्ही कित्येक वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होता. आपण मराठा आरक्षणासाठी काय केले. आपण मुख्यमंत्री होता सरकार चालत होता असेही म्हस्के म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री असताना काय केले असा सवाल ही यावेळी म्हस्केंनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात म्हणजेच 2018 मध्ये हे आरक्षण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर वकील दिला नाही तसेच कागदपत्र ही सादर केले नाही. त्यामुळे मराठ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे हेच असल्याचेही म्हस्के यांनी म्हटले आहे. दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतल्यानंतर चार महिन्यात सर्वेक्षण केले. पूर्ण अभ्यास केला. वकील आणि तज्ञांचा सल्ला घेतला. असेही म्हस्के म्हणाले पुढे बोलताना आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असेही ते म्हणाले. तसेच 22 राज्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकणार असल्याचा दावा करताना ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्या होत्या, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या सरकार ने केलेले आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकणारच आहे. हाच मराठा ऐक्याचा विजय असल्याचेही ते म्हणाले. येत्या दोन- चार दिवसात त्या देशावर राज्यपाल स्वाक्षरी करतील असेही म्हस्के म्हणाले. शपथ यावरून ही उद्धव ठाकरेंना म्हस्के यांनी टार्गेट केले.

error: Content is protected !!