कल्याण पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची उपस्थिती
ठाणे:- माजी केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थीं मेळावा व महा आवास अंतर्गत २०२२-२३ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा निमित्त ठाणे जिल्ह्यातील पाच पंचायत समिती स्थरावर लाभार्थीं मेळावा पार पडला. श्री. शिव छत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे येथिल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणामार्फत ठाणे जिल्ह्यातील पाच पंचायत समिती कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर येथे मोठ्या प्रमाणात लाभार्थीं उपस्थित राहिले.
केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्य मंत्री योगेश कदम तसेच आदी मान्यवर बालेवाडी, पुणे येथे उपस्थित होते.
या कार्यक्रमास पंचायत समिती, कल्याण येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीत संबंधित ग्रामपंचायती, गट विकास अधिकारी (पंचायत समिती, कल्याण) संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी (पं. स. कल्याण) रघुनाथ गवारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (सांखिकी) संतोष पांडे, विस्तार अधिकारी पराग भोसले, विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोस, अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच लाभार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच आवास योजनेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बालेवाडी, पुणे येथील कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तालुके, ग्रामपंचायती, वसाहती व विभागीय स्तरावरील विविध घटकांना सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या वतीने हा उपक्रम पार पाडण्यात आला.
पाच पंचायत समिती स्थरावर महा आवास अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा व लाभार्थीं मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या मेळाव्याचे आवास संदर्भांत माहिती मिळण्यासाठी लाभार्थ्यांना लाभ झाला आहे व पुढील काळात घरकुलाचे काम जलद गतीने पुर्ण करण्याकरीता यांचा लाभ होईल, असे मत प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि शासनाच्या घरकुल योजनेमुळे मिळालेल्या घरामुळे त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल उलगडले.