दिवा:-दिवा शहरातील नागरिकांनी श्रीकांत शिंदे यांच्या विकासाच्या भूमिकेला पाठिंबा देत भरघोस मतदान केले. यापुढेही दिव्यातील जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत राहील असा विश्वास लोकसभा निकालानंतर निलेश पाटील यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात दिवा शहरात अनेक विकास कामे मार्गी लावली. दिवा शहरातील अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. जनतेची काम होत असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला दिवा शहरात यश मिळत असून यापुढेही येथील जनता शिवसेने सोबत राहील असा विश्वास निलेश पाटील यांनी व्यक्त केला.