ठाणे : – सध्या ठाणेकर खासकरुन घोडबंदरकर वाहतुक कोडींने हैराण झाले आहेत. तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडत असलेल्या खड्यांमुळे देखील ठाणेकर त्रस्त होत असतांना दरवर्षी चित्र पहावयास मिळत आहे. परंतु आगामी काळात ठाणे शहर हे वाहतुक कोंडी मुक्त आणि खड्डेमुक्त होणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. महापालिका हद्दीत असलेले सर्वच रस्ते व इतर प्राधिकरणाचे रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करण्याची हमीही त्यांनी दिली आहे.
ठाणे शहरातील वाहतुक व्यवस्था गतीमान करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका हद्दीत येत्या काळात विविध प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहर हे वाहतुक कोंडीमुक्त होईल असा विश्वास त्यांनी अर्थसंकल्प सादर करीत असतांना व्यक्त केला आहे. ठाणे शहरात कोस्टल रोडचा विकास हाती घेण्यात आला आहे. हा रस्ता बाळकुम ते थेट गायमुख पर्यंत १३ किमी लांबीचा रस्ता होत आहे. याशिवाय ठाणे आणि बोरीवलीचे अंतर कमी करण्यासाठी आता ठाणे – बोरीवली या टनेलचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी १६६००.४० कोटींचा खर्च केला जात असून यामुळे बोरीवलीचे अंतर अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे. तसेच ठाणे शहरातून जाणाºया वडाळा ते कासारवडवली मेट्रोसह अंतर्गत मेट्रोच्या कामाला देखील केंद्राने मंजुरी दिली आहे. मुख्य मेट्रोच्या मुलुंड चेक नाका ते गायमुख पर्यंतच्या भागात असलेल्या मेट्रो स्थानकांकडे प्रवाशांना ये जा करण्यासाठी ९ ठिकाणी पादचारी पुल बांधण्याचे काम एमएमआरडीएमार्फत सुरु प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय घोडबंदर भागातील सेवा रस्ते हे मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे घोडबंदर रोड वाहतुक कोंडी मुक्त होणार आहे. घाटकोपर ते ठाणे दरम्यान देखील ईर्स्टन फ्री वेचा विस्तार करण्यात येणार आहे. आनंद नगर ते साकेत या ठिकाणी उन्नत मार्गाचे कामही आता सुरु झाले आहे. शिवाय ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून ठाणे शहर व कोपरी येथील रहिवाशांना आता कोपरी पुलासोबत सब वे चे काम पूर्ण झाले असून त्यामुळे वागळेला जाण्याचा रस्ता सुलभ झाला आहे. तसेच या अंडरपास मधून प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्गिकेचे काम देखील महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरु असून ते डिसेंबर अखेर पर्ण होणार आहे.
खड्डेमुक्तीची हमी
खड्डेमुक्तीसाठी यंदा ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विविध संस्थामार्फत सेवा वाहिन्यांसाठी खोदण्यात येणाºया रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणासाठी २० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या ताब्यातील रस्ते व इतर प्राधिकरणाच्या ताब्यातील रस्ते देखील खड्डेमुक्त करुन ते वाहतुकीसाठी सुरळीत कसे राहितील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.