Homeशहर परिसरशाब्दिक वादातून दिव्यातील तरुणावर प्राणघातक हल्ला ; मारेकरी फरार

शाब्दिक वादातून दिव्यातील तरुणावर प्राणघातक हल्ला ; मारेकरी फरार

शिवसेनेच्या ज्योती पाटील यांची मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी

दिवा: दारू पिताना दिवा, बेडेकर नगर येथील अनुप राजेश लाखन (२४) आणि पिसवली गावातील आकाश भंडारी (२५) या दोघा मित्रांमध्ये डोंबिवली, सोनारपाडा येथे शाब्दिक वाद झाला. त्या रागातून आकाश याने अनुप याच्यावर धारधार वस्तूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले. त्यानंतर मारेकरी आकाश हा पसार झाला आहे.
याचदरम्यान, दिव्यातील तरुणावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांनी केली आहे.
जखमी अनुप हा मागील १५ वर्षांपासून आईवडील व इतर कुटूंबियासोबत दिव्यात वास्तव्यास असून तो डोंबिवली सोनारपाडा येथील झेप्टो या ऑनलाईन कंपनीमध्ये डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो, त्याचा जुना मित्र आणि मारेकरी आकाश भंडारी (२५) हा मागील ५ महिण्यापूर्वी झेप्टो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या तो ब्लिंकीट कंपनीत काम करतो. तो पुन्हा झेप्टो कपनीत काम करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्याकरीता तो बुधवारी ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास झेप्टो कंपनीत आला होता. याचदरम्यान त्याची भेट झाल्यानंतर आम्ही बाहेर एका ठिकाणी मोकळ्या जागेत जावून दोघे एकत्र दारू पियालो. त्यावेळी आमच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर त्या रागातुन आकाश याने त्याच्या जवळील स्कुटीचे डिक्कीमधुन एक धारधार वस्तु काढून माझ्या दोन्ही हात व पोटावर व मानेजवळ मारून मला जखमी करून पळून गेला. त्यानंतर कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या हल्ल्यात नऊ वार झाल्याचे अनुप यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पालवे करत आहे.

error: Content is protected !!