Homeकोकण-महाराष्ट्रशिंदे - फडणवीस सरकार मुंबई बरोबरच ठाण्याचाही विकास करणार - आमदार देरकर

शिंदे – फडणवीस सरकार मुंबई बरोबरच ठाण्याचाही विकास करणार – आमदार देरकर

ठाणे: युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मातोश्रीकडे कंत्राटदारांची जेवढी माहिती असेल तेवढी अन्य कुणाकडे नाही. गेली २५ वर्षे टक्केवारीचा अनुभव आदित्य यांना आहे. असा आरोप करत, आता गेले सहा महिने मुंबईकरांना जे हवे आहे ते शिंदे – फडणवीस सरकार देत आहे. त्यामुळेच त्यांना पोटशुळ उठला असुन मुंबई हातातुन जात असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याची टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच शिंदे, फडणवीस सरकार मुंबई बरोबरच ठाण्याचाही विकास करणार असल्याचे शुक्रवारी ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
      कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा पुन्हा पुर्वीच्याच जोषात ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने २४ व्या मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जाने. ते २२ जानेवारी या दहा दिवसांच्या भव्य मालवणी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी केले. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर,भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे,मा. नगसेवक संदीप लेले,सचिन मोरे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार दरेकर यांनी, ठाकरे सरकारने कोकणी माणसाचा कधीच विचार केला नसला तरी आम्ही कोकणचे सर्व आमदार कोकणच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करू.तसेच, कोकणी उत्पादनाला कायम स्वरूपी बाजारपेठ मुंबई- ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. तसेच यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातुन करणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले. अशा प्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातुन कोकणशी नाळ जोडण्याचं काम केले जात आहे. अशा प्रकारच्या महोत्सवातून छोट्या उद्योजकाना प्रोत्साहन मिळते.दरम्यान, मालवणी महोत्सवात येऊन कसा वाटला ? असा प्रश्न आ. दरेकर यांना करताच त्यांनी, ‘बरा वाटला ‘ असा मालवणी भाषेत संवाद साधुन यापेक्षा अधिक मालवणी भाषा येत नसल्याचे नमुद केले.
चौकट – महोत्सवाला अवश्य भेट द्या
  ठाणेकर या महोत्सवाची वाट बघत असतात, या वर्षी हा उत्सव थोडासा उशिरा सुरू असला तरी, तोच उत्साह आहे. या ठिकाणीं मांसाहार बरोबर शाकाहारी पदार्थाची चव चाखता येणार आहे. त्यामूळे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी. असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले.

error: Content is protected !!