Homeठाणे-मेट्रोसाडे सहा एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे दिव्याची तहान भागणार…

साडे सहा एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठ्यामुळे दिव्याची तहान भागणार…

दिवा:-अनेक महिन्यांपासून दिवा विभाग आणि परिसरात पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत होती. दिवा शहर आणि परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत असून त्यामुळे या भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा ताण पडत असल्याकारणाने येथे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवली होती. दिव्याला अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदय मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी तातडीने ठाणे तसेच दिवा शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

राज्याचे  मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदय मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी तातडीने ठाणे तसेच दिवा शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

त्याप्रमाणे अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध झाला असून आज कोरम मॉल ठाणे परिसरातील व्हॉल सुरु करत हा पाणी पुरवठा नियमित केला. यातून साडे सहा एमएलडी पाणी पुरवठा हा दिवा विभाग आणि परिसराला आजपासून होणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीपासून असलेली दिवा विभाग आणि परिसरात पाणी टंचाईची समस्या आता कायमस्वरूपी सुटणार आहे.

याप्रसंगी माजी महापौर आणि ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, अशोक वैती, ठाणे महानगरपालिका अधिकारी सचिन आहेर, मनपा उपयुक्त मनीष जोशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!