निवडणुकीच्या तोंडावरच कांदळवणाची नोटीस कशी येते?, प्रकाश पाटील यांचा सवाल
दिवा:- साळवी नगर वाशी यांना निवडणुकीच्या तोंडावरच कांदळवनची नोटीस कशी येते असा सवाल करत, कांदळवन घोषित करून दिव्यातील साधारण दोन हजार कुटुंबांना बेघर करू पाहणाऱ्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. एकाही सामान्य नागरिकाच्या घराला हात लावू दिला जाणार नाही असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कांदळवन घोषित करून नागरिकांना घाबरवून त्यामागून काही राजकारण करण्याचा हेतू आहे का? असाही सवाल प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर याआधी साळवी नगरचे क्लस्टर सर्वेक्षण झाले असताना आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा कांदळवन सर्वेक्षण कसे असाही प्रश्न प्रकाश पाटील यांनी उपस्थित केला आहे. गोरगरीब जनतेला निवडणूक काळात मतांसाठी, घाबरवण्यासाठी असे प्रकार केले जातायेत का असे सांगताना या नोटिशी विरोधात आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही प्रकाश पाटील यांनी सांगितले आहे .दिव्यातील साळवी नगर भागात असणाऱ्या बैठ्या चाळी व परिसराला कांदळवन घोषित केल्याने नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाल्याची चर्चा अलीकडे होती. प्रशासनामार्फत सदर जागेचा सर्वे होणार अशी माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांना मिळाल्यानंतर नागरिकांच्या बाजूने मनसे मैदानात उतरली असून सर्वसामान्य नागरिकांना बेघर होऊ दिले जाणार नाही असे स्पष्ट मत मनसेचे प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.गरजेपोटी, गावठाणाच्या विस्तारा साठी किंवा अन्यकारणाने या भागात घरे बांधली गेली असल्यास आणि सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी वास्तव्याला असल्याने या घरांना प्रशासनाने हात लावू नये असेही मनसेचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी घर बांधले गेली त्यावेळी प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता साधारण दोन हजार कुटुंबाचे संसार उध्वस्त करण्याची भूमिका घेतली जाणार असेल तर येथील भूमिपुत्र आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही उभे राहू असे मनसेचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या भागात सर्वेसाठी प्रशासनाचे अधिकारी आल्यास नागरिकांनी आम्हाला कळवावे. लगतचे हिस्सेदार हे खाजगी जमिनीचे मालक आहेत.नागरिकांना बेघर करण्याची भूमिका प्रशासनाने घेऊ नये असेही प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.