तीन सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचे हस्तांतरण
ठाणे :- ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील साचुन राहिलेला कचरा तातडीने मौजे आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रकिया सुरु झालेली आहे.
याकरिता, तीन सत्रात जादा वाहनांचा वापर करुन सीपी तलाव येथील कचऱ्याचे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात घरोघरी जाऊन कचरा संकलनाची प्रक्रिया नियमितपणे होईल. वरील अडचणीमुळे शहरात निर्माण झालेले कचऱ्याचे ढीग अतिरिक्त वाहनांचा वापर करुन उचलण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या देखरेखीत, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात साचलेल्या कचरा उचलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. होळीच्या पुर्वसंध्येला शहरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.