दिवा:- दिवा गाव व दिवा पश्चिमेकडील नागरिकांना पाणीटंचाई पासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पुश थ्रू पद्धतीने रेल्वे पटरी खालून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या कामाच्या संदर्भात पाहणी दौरा ठामपा अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांसोबत केला.
दिवा गाव व दिवा पश्चिमच्या संपुर्ण परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी रेल्वे पटरी खालुन पुश-थ्रु पद्धतीने जलवाहिनी टाकण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी माजी नगरसेवकांसह परिसरात पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॅा श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच दिव्यातील शिवसेना माजी नगरसेवक रमांकांत मढवी, शैलेश पाटील,अमर पाटील, दिपाली भगत यांच्या सततच्या मागणी व पाठपुराव्यानंतर दिवा गाव व दिवा पश्चिमच्या संपुर्ण परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी रेल्वे पटरी खालुन पुश-थ्रु पद्धतीने जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत मध्य रेल्वेची परवानगी मिळाल्यानंतर सदरची पाहणी करण्यात आली . यावेळी मा . नगरसेवक शैलेश पाटील , अमर पाटील , ठा.म.पा अभियंता साळुंखे व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. सदर कामाला पुढच्या महिन्यात सुरुवात होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.