Homeशहर परिसरदिवा-आगासन रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार?

दिवा-आगासन रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार?

दिवा:गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेच्या गलथान कारभारामुळे पाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवा-आगासन रोडवारील खड्ड्याने गणेश पाले या तरुणाचा जीव घेतला आहे.साईबाबा नगर येथील खड्ड्यांमुळे या निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे.या प्रकारामुळे पालिकेच्या गलथान कारभारविरोधात आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहात,दिवा आगासन रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी,तरुणाला न्याय देण्यासाठी संबंधित लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा!

-रोहिदास मुंडे, अध्यक्ष
दिवा शहर मंडळ,भाजप


रविवारी रात्री 8 वाजता झालेला हा दुर्दैवी अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मागील पाच वर्षांपासून दिवा आगासन या 3 किमी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.याआधी देखील दिवा आगासन रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे काजींना जीव गमवावा लागला आहे.गणेशोत्सव आधी दिव्यातील खड्डे बुजवा अशी मागणी नागरिक वारंवार करत असताना सुद्धा त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा अपघात झाला असे नागरिक बोलत आहेत.

error: Content is protected !!