दिवा:-शहरातील जनतेचा वाढीव लोकल सेवेचा प्रश्न सुटत नसला तरी दिव्यात उदघाटन वरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई पुन्हा एकदा पहायला मिळाली. दिवा रेल्वे स्टेशन पूर्वेकडील सरकत्या जिन्याचे उदघाटन चक्क दोन वेळा पार पडले.शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या वेळी या जिन्याचे उदघाटन केले.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी भाजप शिवसेना दिव्यात नागरिकांना पुरेशा नागरी सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यास एकीकडे अपयशी ठरत असले तरी दुसरीकडे रेल्वे मार्फत झालेल्या सरकत्या जिन्याचे उदघाटन मात्र दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळी केले.वेगवेगळ्या झालेल्या या उदघाटन मुळे ही श्रेयवादाची लढाई आहे अशी चर्चा नागरिकांत आहे.दिवा पूर्वेला रेल्वे मार्फत सुरू करण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचे उदघाटन सकाळी दिवा शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडले यानंतर मात्र सायंकाळी दिवा भाजपच्या वतीने याच सरकत्या जिन्याचे उदघाटन करण्यात आले.एकाच जिन्याचे दोघांनी वेगवेगळे उदघाटन केल्याने दिव्यातील रेल्वेचे प्रश्न सुटणार आहेत का?असा सवाल रेल्वे प्रवासी करत आहेत.