Homeठाणे-मेट्रोनागरिक एकत्र येत असतील तर हा धोक्याचा इशारा - डॉ. जितेंद्र आव्हाड

नागरिक एकत्र येत असतील तर हा धोक्याचा इशारा – डॉ. जितेंद्र आव्हाड

येत्या २ ऑक्टोबर ला दांडी(रेल) मार्च

ठाणे: गर्दीच्या वेळेस एसी लोकल बंद करा ही साधी मागणी आता जोर धरत आहे. त्यातच,स्लो लोकलच्या ट्रॅकवरुन धावत असणाऱ्या मेल एक्सप्रेसचा ध्वनीचे डेसिबल हे १७५ च्या वरती गेलेले आहे. हे कुठल्या कायद्यात बसते. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला काही स्पेशन परवानगी दिली आहे का असा सवाल  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करत, पोलीसांनी ह्या देखील तक्रारीची नोंद घ्यावी.असे म्हटले आहे.

 याचदरम्यान लोकांच्या ज्या मागण्या आहेत. रेल्वेने त्या मागण्या गांभीर्याने घ्यावे. अन्यथा ही गर्दी हजारोने वाढण्यास काही जास्त वेळ लागणार नाही. हा सावधानतेचा सूचक इशारा देत,अशाप्रकारे नागरिक एकत्र येत असतील तर हा धोक्याचा इशारा रेल आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला. आंदोलनाशिवाय पर्याय नसेल तर हे आंदोलन कोणाच्या हात राहणार नाही. येत्या २ ऑक्टोबरला दांडी (रेल) मार्च काढण्यात येईल असेही ते म्हणाले . 

     एसी लोकलच्या विरोधात काय भूमिका घ्यायची आणि रेल्वेच्या इतर समस्यांसाठी कोणती भूमिका घ्यायची. यावर चर्चा करण्यासाठी रविवार २८ ऑगस्ट रोजी कळवा येथील कावेरी सेतू, येथे एका बैठक आयोजन केले होते. यावेळी रेल्वे प्रवास संघटनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

       कळवा येथे सर्व रेल्वे प्रवाशांना जमावे असे आवाहन मी केले होते. एसी लोकल संदर्भातील पुढची भूमिका काय असावी याबाबत एकत्रित बसून निर्णय घेवूया हा यामागचा विचार होता. लोक किती जमतील याबद्दल माझ्या मनात शाशंका होती. पण १२ च्या आतमध्येच मला कळव्यातील कार्यालयातून फोन येऊ लागले की, लोक वाढतायेत आपण लवकर या. मी पोहचलो तेव्हाच तिथे गर्दी जमलेली होती. खरतर रविवारच्या दिवशी मध्यमवर्गीय कष्टकरी हा येईल असे मला वाटले नसताना देखील प्रचंड प्रमाणात लोक जमा झाली होती. याचा अर्थ एकच की, लोकांना प्राप्त परिस्थितीबद्दल प्रचंड राग आहे.असे दिसून आल्याचे डॉ आव्हाड म्हणाले. पुढे बोलताना, त्यांनी 

गर्दीच्या वेळेस साध्या लोकल कमी करुन एसी लोकल सुरु करणे ही कुठल्या मूर्ख माणसाच्या डोक्यातून कल्पना बाहेर पडली हेच मला कळत नाही. आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास हा असाह्य आहे हे आजच्या गर्दीवरुन दिसून. गर्दीच्या वेळेस एसी लोकल बंद करा ही साधी मागणी आता जोर धरत आहे. यामध्ये ठाण्यातील देखील लोक सहभागी झाली होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ८ ते १० या वेळेमध्ये चार साध्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या साध्या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांची काय व्यवस्था केली आहे याचे उत्तर रेल्वे प्रशासनाकडे नाही. हेच कळवा, मुंब्र्यामध्ये थांबणा-या सेमी फास्ट, फास्ट तसेच स्लो लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि एसी लोकल वाढवण्यात आल्या आहेत. हा रेल्वे प्रशासनाचा तद्दन मूर्खपणा आहे. असेही ते म्हणाले. त्याचबरोबर एक कळीचा मुद्दा पुढे येतोय. तो म्हणजे लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरुन एक्सप्रेस आणि मेल धावत आहेत. प्रश्न असा आहे की,  सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची मर्यादा आखून दिलेली आहे. पण, आता स्लो लोकलच्या ट्रॅकवरुन धावत असणाऱ्या मेल एक्सप्रेसचा ध्वनीचे डेसिबल हे १७५ च्या वरती गेलेले आहे. हे कुठल्या कायद्यात बसते. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला काही स्पेशन परवानगी दिली आहे का ? पोलीसांनी ह्या देखील तक्रारीची नोंद घ्यावी अशी जाहीर मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. या सगळ्या मागण्या ह्या लोकांच्या मनातील मागण्या आहेत. रेल्वेने हे सर्व गांभीर्याने घ्यावे. अन्यथा ही गर्दी हजारोने वाढण्यास काही जास्त वेळ लागणार नाही. हा सावधानतेचा सूचक इशारा आहे. हा इशारा फक्त एकदोन स्टेशन पुरता नाही तर मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे ला लागू आहे याचीही त्यांनी आठवण करू दिली. तसेच येत्या २ ऑक्टोबर ला दांडी (रेल) मार्च काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

error: Content is protected !!