Homeठाणे-मेट्रोमनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती - आनंद परांजपे

मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती – आनंद परांजपे

मनसे महायुतीत सामील झाल्यास महायुतीतील उमेदवारांना फायदा

ठाणे : मनसे महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास, ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर आदी जागांवर, महायुतीतील उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले. दरम्यान लोकसभा जागा वाटपाचा योग्य निर्णय, प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा लढायला मिळतील. ४५ प्लस जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणे हा संकल्प आहे. असे मत, त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दिल्लीमध्ये १९ तारखेलाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई येथील ताज लॅण्ड इन हॉटेल येथे बैठक झाली. असे संकेत आहेत की मनसेची महायुतीमधील समावेशाची अधिकृत घोषणा महायुतीचे नेते लवकरच करतील. मनसे जर महायुतीमध्ये आली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागतच करेल. असे परांजपे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ४५ प्लस लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी जे जे घटक पक्ष एनडीए मध्ये येतील, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये येतील त्यांचे स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. महायुतीतील सर्व राजकीय नेत्यांमध्ये समन्वय आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचे जागावाटप होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीस हे तीनही नेते बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील. असे ही म्हटले आहे.

  • गाय मारली म्हणून वासरु मारू नये…

मुंबईला प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, की शिवतारे या विषयाला फार महत्व देऊ नका. मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील. एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरु मारायचे नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही राजकीय प्रगल्भता आहे. कुठला विषय कुठपर्यंत ताणायचा आणि कुठला विषय कधी सोडून द्यायचा. महायुतीला कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल असे कुठलेही वक्तव्य किंवा कृत्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडणार नाही. असेही परांजपे पुढे म्हणाले.

error: Content is protected !!