Homeठाणे-मेट्रोशेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन

शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन

ठाणे : पंजाब, हरयाणा येथील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरयाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून, दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे,यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलकांनी हातामध्ये , शेतकऱ्यांवर गोळीबार , आता नाही सहन होणार; शेतकर्यांच्या मागण्या मान्य करा; जगाच्या पोशिंद्याला जगू द्या; असे फलक हातात घेतले होते.

दरम्यान, ऋताताई आव्हाड म्हणाल्या की, शेतकरी वर्ग आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पहिला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी सन 2021 मध्ये शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन चिरडण्यात आले होते. सन 2014 पासून शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याची शिफारस केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी आणि 2021 च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांस अर्थसाहाय्य द्यावे, या साध्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. पण, मागण्या मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रूधूर सोडण्यात येत आहेत. पंजाबमधील शेतकरी हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचीही अवस्था वाईट आहे. सामान्य माणसाला महाग झालेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्यायला आवडते. मात्र, शेतकर्‍यांचा शेतमाल महाग झाला तर गहजब माजवला जातो. म्हणूनच शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीची कमाई मिळावी, यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत.
मोदी सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत आहे का, याबद्दल विचारले असता, हे सरकार एका माणसाचे नाही. आज अनेकांना देशाचे कृषीमंत्री कोण आहेत याचाच पत्ता नाही. त्यामुळे आपण मोदी सरकार असा उल्लेख करू नये, असे आवाहनही ऋताताई आव्हाड यांनी केले. तर, सुहास देसाई यांनी, शांततेत दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, त्यांच्यावर अश्रूधुराचे नळकांडे फोडणे, वाटेत खिळे ठोकणे हे प्रकार केले जात आहेत. जणू काही हे शेतकरी परकीय आक्रमक आहेत. अशा पद्धतीने वागले जात आहे. देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या वाटेत खिळे पेरणारे लोखंडाचे चणे चावतील. याची जाणीव या सरकारने ठेवावी, आम्ही या आंदोलनासाठी रस्त्यावर बसलो आहोत. कारण, आमचे पोट भरणारा जगाचा पोशिंदा जर खिळ्यांवर चालत असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. आज देशाचा कणा असलेला शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत असताना त्यांचे आंदोलन चेपून टाकले जात आहे. ही बाब लोकशाही संपत चालली असल्याचेच उदाहरण आहे. आमचे हे आंदोलन फक्त शेतकरी समर्थनासाठी नाही तर आमचे आंदोलन लोकशाही संवर्धनासाठीही आहे. कारण, हे सरकार आंदोलकांवर गोळीबार करून लोकशाहीतील हा अधिकार हिरावून घेत आहे, अशी टीका केली.

या आंदोलनातप्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह,प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे,विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी,असंघटित कामगार सेलचे राजु चापले व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय,वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस,कार्याध्यक्ष सुभाष यादव,महेंद्र पवारअंकुश मढवी,रचना वैद्य,एकनाथ जाधव,रोहिदास पाटील,शिवा कालूसिंह,संजीव दत्ता,विशाल खामकर,पप्पू अस्थाना,सुरेंद्र यादव,इकबाल शेख,स्वरूप सिंग,वैभव खोत, हरपाल सिंग,संतोष मोरे,कुणाल भोईर,आशिष वाघ,संदीप पवार,रोहित भंडारे,निलेश गायकवाड, फुलबानो पटेल,ज्योती निंबर्गी,माधुरी सोनार,साबिया मेमन,शुभांगी खेडकर,मल्लिका पिल्ले, हाजी बेगम शेख,वंदना भाईगंडे प्रतिभा पूर्णेकर,रेणू अलगुडे,गायत्री आर्यमाने,उषा नारोड,ज्योती सांगळे,अलका शिंदे,ज्योती कवळे,श्रुती डीचोलकर,पूजा शिंदे,पूजा दामले,स्नेहल फुंडकर,दिलीप उपाडे,वैभव विचारे,आशिष खाडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

error: Content is protected !!