दिवा:-मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी यावेळी 45 पारचा नारा महायुतीने दिला आहे. दिवा शहरातील व कल्याण लोकसभेतील भाजपचे सामान्य कार्यकर्ते,उत्तर भारतीय हे देशात मोदी सरकार मजबूत होण्यासाठी शिवसेनेच्या बाजूनेच उभे राहतील.दिव्यातील भाजपच्या पदाधिकार्यांनी युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असे शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी म्हटले आहे.
कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभा करा अशी मागणी दिवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केल्यानंतर शिवसेनेच्या दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला असून कल्याण लोकसभेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणताही पर्याय उमेदवार नसून डॉ. शिंदे यांचा एक हाती विजय निश्चित आहे. विरोधकांना त्यांच्यासमोर उमेदवार ही सापडत नाही अशा स्थितीत श्रीकांत शिंदे यांना कमळाच्या चिन्हावर लढा असं सांगणारे भाजपचे नेते हे स्वतच्या प्रसिद्धिसाठी करत असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.कल्याण लोकसभेत डॉ श्रीकांत शिंदे यांचे काम इतके मजबूत आहे की त्यांच्या विरोधात विरोधकांना उमेदवार सापडत नाही अशा स्थितीत युतीतील काही लोकांनी नको ती वक्तव्य करणे योग्य नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.येत्या निवडणुकीत डॅा.श्रीकांत शिंदे यांच्या कार्याच्या जोरावर दिवा विभागातून विक्रमी मतदान होईल आणि भाजप चे जुने कट्टर कार्यकर्ते नक्कीच मोंदीना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युती सोबत राहुन काम करतील असा विश्वास निलेश पाटील यांनी व्यक्त केला आहे .