दिवा:-कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला.कल्याण लोकसभेतील जनतेने विकासासाठी मतदान केलेले आहे.त्यामुळे विजय किती मतांनी होणार हाच प्रश्न आहे असे मत मतदानानंतर कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी यांनी व्यक्त केले.
कल्याण लोकसभेमध्ये महायुतीचे निवडणुकी पूर्वीपासूनच प्राबल्य असल्याची चर्चा होती.त्यात महाआघाडी कडून कमकुवत उमेदवार दिल्याने श्रीकांत शिंदे यांचा विजय एकतर्फी मानला जात होता.अशातच मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच राहिल्याने श्रीकांत शिंदे यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.अशातच शिवसेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी यांनी याबाबत भाष्य केले आहे. वीस तारखेला पार पडलेल्या मतदानानंतर रमाकांत मढवी म्हणाले की ज्या दिवशी श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला होता.कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात त्यांनी केलेली विकास कामे लक्षात घेऊन येथील सर्वसामान्य जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केले आहे.डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भरघोस मतांनी या निवडणुकीत विजयी होतील यात कोणतीही शंका नाही.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली असून आता विजयानंतर जास्तीत जास्त मताधिक्य किती मिळेल इतकाच प्रश्न आहे असे रमाकांत मढवी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत विकासाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे रमाकांत मढवी यांनी आभार मानले आहेत.